Jun 7, 2019

आठवणींचा गंध पुरे !

नको परतणे फिरुनी मागे
पुढे जायच्या वाटेवरती
आठवणींचा गंध उराशी पुरे ! नको वेडी गाणी

दोन दीसांच्या संसाराची
धुरा वाहूया आंनदाने
आठवणींचा गंध येऊदे घटनांचे निर्माल्य

क्षण क्षण येता येता जातो
देतो पश्चात्ताप
प्रायश्चित्त घेताना सरते क्षण क्षण आयुर्मान

आठवणींचे सार कोणते?
काय शिकावे त्यांतून?
‘गंध फुलांचा’ याहून काही नसे त्यांस सारांश 

सुकती पाने, फूलपाकळ्या
काळाच्या ओघात
गंध राहतो त्या सर्वांचा केवळ मनांमनांत

नको दु:ख गेल्याचे आणि
नको क्लेश मृत्युचा
गेले ना जर काही मागे कशी नव्याला वाट मिळे?

No comments:

Post a Comment