कळले न मजला सरले कधी ते
तारुण्य अवघे दारात होते
आयुष्य माझ्या मुठीत होते
अशक्य तेंव्हा काहीच नव्हते
म्हणतात कोणी दिन ते हरवले
किती रम्य आनंद देवून गेले
कधी कदापि सुख दु:ख अश्रू
नयनांत माझ्या थबकून गेले
जुळले अनंत सौहृद्य बंध
तुटले कितीदा उगाच मित्र
संदर्भ त्यांचे मोडीत गेले
तरीही कितीसे शिकवून गेले
आले किती अन् गेले किती ते
हिशेब त्याचा न मांडला मी
उद्या न जाणो काही कुठेही
घडेल कसेही हे जाणिले मी
आरशात माझे रुपडे बदलले
म्हणतात सारे वयही उलटले
माझ्या मनातील तरंग मात्र
कधी न विरले, वृद्धीत झाले
आहेत अजुनी कित्येक दिन
मनात माझ्या उल्हास आणि
सुख दु:ख ठोकारून मी पहाते
स्वप्ने अजूनही कित्येक मोठी
No comments:
Post a Comment